निकालानंतर प्रथमच वळसे-पाटील -शरद पवार भेट

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर वळसे-पाटील यांनी माध्यमांशी सांगितले की, आमची भेट राजकीय नव्हती. फक्त मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. आज यशंवतराव चव्हाण विश्वस्त प्रतिष्ठान मंडळाची बैठक […]

पहिल्याच कसोटीतन ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

पर्थ – भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या गावस्कर – बॉर्डर चषकातील पहिल्याच कसोटी सामन्यात, भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा विजय मिळवत या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात फक्त १५० धावा केल्या. मात्र दुसऱ्या […]

डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत, यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती, डोंबिवलीतील काही प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.डोंबिवली पूर्वेतील फ, ग आणि पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण वाहिन्यांत गळती सुरू आहे. […]

अनिल देशमुखांच्या घरासमोर अजित पवार गटची बॅनरबाजी

नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर अजित पवार गटाचे नागपूर शहरप्रमुख प्रशांत पवार आणि जिल्हाप्रमुख बाबा गुजर यांनी देशमुखांच्या घरासमोरच भले मोठे बॅनर लावून त्यांना डिवचले आहे. या बॅनर “महाराष्ट्राने ठरवले राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे वारसदार अजितदादाच आणि ‘तुतारी’चे निवडून आलेले दहा […]

भंडाऱ्यात ट्रॅक दरीत कोसळून एकाचा मृत्यू

भंडारा- तुमसर-बपेरा मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन जाणारा ट्रॅक दरीत खाली कोसळला. ही घटना आज सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात वाहकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक हा गंभीर जखमी झाला.जितू सयसपूर असे मृत वाहकाचे नाव असून आकाश बारबैले असे जखमी चालकाचे नाव आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक खैरलांजी पुलावरून खाली […]

राहुल गांधींचे नागरिकत्व प्रकरण! सुनावणी १९ डिसेंबरला होणार

लखनौ- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणावर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.यापूर्वी २४ ऑक्टोबरला न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) सूर्यभान पांडे यांना याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहिती घेण्याचे निर्देश […]

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखला

कराची- कराचीत तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी भव्य मार्चा काढून राजधानी इस्लामाबादकडे कूच केली. मात्र पोलिसांनी अश्रुधूरच्या नळकांड्या फोडत हा मोर्चा रोखला. त्यानंतर पोलिसांनी इम्रान समर्थकांची धरपकड केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि विरोधी पक्षनेते उमर अयुब यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय समर्थकांचा मोर्चा पंजाबमार्गे स्वाबीहून […]

संभलमध्ये हिंसाचार भडकावला! सपा खासदारावर गुन्हा दाखल

मुरादाबाद -उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार भडकावणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्क आणि स्थानिक आमदाराचा मुलगा सोहेल इक्बाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुर्क यांच्यावर सुनियोजित पद्धतीने हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.संभलच्या शाही जामा मशिदीत काल जिल्हा न्यायालयाच्या […]

तो पुन्हा येतोय ! आमदाराकडून फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट

मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, यावरून महायुतीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असे भाजपा आमदारांना वाटत असताना भाजपाचे […]

मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ! आदित्य ठाकरेंचा निर्धार व्यक्त

मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून आदित्य ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत तुमच्या पाठिंब्यासाठी आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. अनेकांचे आभार मानणे मला शक्य झाले नाही त्याबद्दल माफी. ही निवडणूक विश्लेषणापलीकडची […]

तमाशा कला अभ्यासक मधुकर नेराळे यांचे निधन

मुंबई- तमाशा कला अभ्यासक आणि गायक, नाट्यनिर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नेराळे यांचे निधन झाल्याने तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरम शांती निकेतन पुरस्कार, सांगलीचा कर्मयोगी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.मधुकर नेराळे यांचे वडील पांडुरंग नेराळे […]

भाजपाविरोधी वादग्रस्त वक्तव्याची मौलाना नोमानी यांची बिनशर्त माफी

मुंबई – राज्यातील निवडणुकीपूर्वी मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली असून, याबाबत खुलासा करणारे पत्रक काल एक्सवरून पोस्ट केले.ऑल इंडिया एकता फोरमचे अध्यक्ष मौलाना सज्जाद नोमानी यांचा भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका, भाजपाला मत देऊ नका, महाविकास आघाडीला साथ द्या. असे वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडीओ […]

कोलकाता आंदोलक डॉक्टरांचा कोठडी छळ! सीबीआय चौकशीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली – कोलकातातील आंदोलनकर्त्या दोन महिला डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत झालेल्या कथित छळाची सीबीआय चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले. याप्रकरणाची सीबीआयऐवजी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.कोलकाताच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ राज्यातील निवासी […]

वरळी हिट अँड रन प्रकरण! मिहीर शहाची याचिका फेटाळली

मुंबई – मुंबईतील वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या अटकेला आव्हान देणारी त्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने त्याची सुटका करण्यासही नकार दिला.मुंबईतील वरळी परिसरात ९ जुलै रोजी भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा नावाच्या महिलेला चिरडले. या मोटारीत मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिंदावत होता. कारने […]

मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस रात्रीचा ब्लॉक रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीचच्या नूतनीकरणासह इतर कामांसाठी २६, २७ आणि २८ नोव्हेंबरला विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक निश्चित केला आहे. ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, लोकल सेवेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही. […]

जीपीएसवर विसंबून राहणे जीवघेणे अपूर्ण पुलावरून तिघांचा मृत्यू

गुरुग्राम – तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे त्रासदायक आणि कधीकधी जीवघेणेही ठरू शकते याची प्रचिती देणारी एक दुदैवी घटना काल सकाळी दिल्लीलगतच्या गुरुग्राम येथे घडली. कारमधील जीपीएस प्रणालीने चुकीचा मार्ग दाखवल्याने एका अपूर्णावस्थेत असलेल्या पूलावरून कार खाली कोसळली आणि कारमधील तिघांचा मृत्यू झाला.गुरुग्राममधील एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करणारे हे तीन […]

बोधगया बुद्ध मंदिर व्यवस्थापनातील हस्तक्षेपाच्या विरोधात आज देशव्यापी आंदोलन

मैसुर – बोधगया येथील अडीच हजार वर्षे पुरातन बौद्ध मंदिराच्या व्यवस्थापन समितीत चार हिंदू धर्मीय सदस्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील बौद्ध धर्माचे अनुयायी उद्या देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती मैसुरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांनी काल दिली. मैसुरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, उद्या शहरातील बौद्ध धर्मीय मैसुरच्या सिद्धार्थनगर येथील बुद्धाच्या […]

पाकिस्तानात शिया सुन्नींमधील संघर्षात ८० लोकांचा मृत्यू

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेनजिक असलेल्या खैबर पख्तूनख्वा येथील कुर्रम जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिया व सुन्नी मुस्लीमांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात ८० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. या दोन्ही गटांनी युद्धविराम घोषित केला असला तरी या भागात तणावपूर्ण शांतता आहे.कुर्रम जिल्ह्यातील अलीजई आणि बागान कबिल्यां मध्ये […]

मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अजूनही कायम! दिल्लीकडे लक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गटनेतेपदी निवड

मुंबई – महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला अतिप्रचंड असे बहुमत दिले. भाजपाला एकट्याने सत्तास्थापन करता येईल या स्थितीच्या अगदी जवळ आणून ठेवले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव लगेच घोषित होईल अशी जनतेची अपेक्षा असली तरी आजचा पूर्ण दिवस मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायमच राहिला. सरकार स्थापनेच्या हालचाली मात्र आज वेगाने सुरू होत्या. येत्या मंगळवारी […]