Home / महाराष्ट्र / Prasad Vedpathak : नेमकं असं काय घडलं की प्रसाद वेदपाठकवर हात जोडण्याची वेळ आली?’सगळं संपलंय…’ म्हणत प्रसिद्ध ब्लॉगर प्रसाद वेदपाठकचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल!”

Prasad Vedpathak : नेमकं असं काय घडलं की प्रसाद वेदपाठकवर हात जोडण्याची वेळ आली?’सगळं संपलंय…’ म्हणत प्रसिद्ध ब्लॉगर प्रसाद वेदपाठकचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल!”

Prasad Vedpathak : मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात जैन धर्मगुरूंच्या आगमनानिमित्त मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता विकोपाला...

By: Team Navakal
Prasad Vedpathak
Social + WhatsApp CTA

Prasad Vedpathak : मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात जैन धर्मगुरूंच्या आगमनानिमित्त मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता विकोपाला गेला आहे. या प्रकरणाला आता तीव्र धार्मिक आणि राजकीय रंग चढला असून, हा वाद थेट ‘मराठी विरुद्ध जैन’ असा पेटला आहे. या संपूर्ण वादाला तोंड फोडणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक अत्यंत धक्कादायक आणि भावूक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या जीवाला गंभीर धोका असल्याचे सांगत, “हा कदाचित माझा शेवटचा व्हिडीओ असू शकतो, माझ्यासोबत काहीही बरं-वाईट घडू शकतं,” अशी भीती व्यक्त केल्याने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याने या प्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंताऱ्यांकडे न्यायाची आणि संरक्षणाची आर्त हाक मारली आहे.

पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय आहे?
प्रसिद्ध आशय लेखक (कंटेंट क्रिएटर) प्रसाद वेदपाठक याने काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील ‘कैलास अव्हेन्यू’ या आपल्या सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा मुद्दा उपस्थित केला था. जैन समाजाच्या साधू-संतांच्या पाऊलखुणा पवित्र ठेवण्याच्या उद्देशाने सोसायटीतील इतर सदस्यांची कोणतीही परवानगी न घेता ही पट्टी मारण्यात आली होती. या प्रकारामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या धार्मिक व वैयक्तिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा प्रसादने एका व्हिडीओद्वारे केला होता. प्रसादने या भेदभावाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर आणि वाढत्या दबावानंतर, संबंधित जैन कुटुंबाने ती पांढरी पट्टी तिथून स्वतःहून हटवली होती. त्यानंतर प्रसादने “माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे,” अशी समोपचाराची पोस्टही शेअर केली होती. मात्र, खरा वाद त्यानंतरच सुरू झाला.

“खोटे गुन्हे आणि पाठलाग”; व्हिडीओमध्ये प्रसाद वेदपाठकचा गंभीर आरोप
प्रसादने आपल्या ताज्या व्हिडीओमध्ये अत्यंत चिंताग्रस्त आणि भावूक होऊन संपूर्ण घटनाक्रम मांडला आहे. तो म्हणाला, “४ जून रोजी हा वाद झाला, ८ जूनला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि ९ जून रोजी त्यांनी ती पट्टी काढली. मात्र, ११ जून रोजी स्थानिक माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलिसांना एक पत्र लिहून माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तेव्हापासून आमचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. काही अज्ञात लोकांकडून आमचा सतत पाठलाग केला जात आहे. आम्हाला धमकावण्यासाठी आणि मानसिक दबावात ठेवण्यासाठी आमच्या घरापर्यंत माणसे पाठवली जात आहेत. माझे आई-वडील, भाऊ, सासरे आणि पत्नी दीपिका हे सर्व या मानसिक त्रासाचे थेट साक्षीदार आहेत.”

पुढे बोलताना प्रसादने आपल्या अटकेची आणि जीवाची काळजी व्यक्त केली. “माझ्यावर सर्व बाजूंनी खोटे गुन्हे दाखल करण्याचे कारस्थान सुरू आहे. मला या प्रकरणात पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला कोणाचाही पाठिंबा मिळत नसून केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) माझ्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस दाखवले आहे. राजसाहेब ठाकरे, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना या प्रकरणातील संपूर्ण सत्य माहीत आहे. माझ्या माहितीनुसार, माझ्याविरोधात आधीच एक खोटी ‘एफआयआर’ (FIR) दाखल करण्यात आली आहे. ज्या शब्दांचा उच्चार प्रवीण छेडा यांनी केला होता, तेच ‘जिहादी’ सारखे गंभीर शब्द माझ्या नावावर खोट्या तक्रारीत जोडण्यात आले आहेत. माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सामूहिक रिपोर्टिंग (मास रिपोर्टिंग) करून ते सस्पेंड केले जात आहेत.”

मुख्यमंत्र्यांना साकडं आणि व्यवस्थेकडे न्यायाची याचना
अत्यंत हताश झालेल्या प्रसाद वेदपाठक याने मुख्यमंताऱ्यांना उद्देशून सांगितले की, “मी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करतो की, कृपया माझ्याबाबत आणि माझ्या पार्श्वभूमीबद्दल सविस्तर माहिती घ्या. मी आजपर्यंत माझे फॉलोअर्स कसे कमावले, मी देशासाठी काय काम करतो, हे प्रशासनाने तपासावे. माझ्याविरोधात समाजात जाणीवपूर्वक चुकीचा संदेश पसरवला गेला आहे, ज्यामुळे लोक माझ्या जीवावर उठले आहेत. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, परंतु एक अदृश्य यंत्रणा माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मागे लागली आहे. मी माझ्या घराचा एकमेव कर्ता पुरुष आहे. मी कधीही आयुष्यात कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. जर मला खोट्या गुन्ह्यांत अडकवून अटक केली, तर माझे कुटुंब रस्त्यावर येईल.”

व्हिडीओच्या शेवटी त्याने अत्यंत थेट आणि मूलभूत प्रश्न विचारत जनतेला विचार करायला भाग पाडले आहे. तो म्हणाला, “आमच्याच हक्काच्या जमिनीवर, आमच्याच सोसायटीत आम्हाला दाबण्याचा प्रयत्न झाला, मी फक्त त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आता मला सांगा, ज्यांनी नियमबाह्य रेघ मारली तो चुकीचा की ज्याने त्याविरुद्ध आवाज उठवला तो चुकीचा? आम्हाला फक्त न्याय हवा आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या