रेल्वेचा ढिसाळ कारभार उघड तेजसच्या प्रवाशांचा खोळंबा

बडोदा – पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना काल समोर आला असून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्वसूचना न देता अचानक बडोदा स्थानकात संपवण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. रेल्वेने या प्रवाशांकडून तिकीटसाठी १७०० रुपये घेतले होते. मात्र परत करतांना केवळ ३०० रुपये परत केल्यामुळेही प्रवाशांचा संताप झाला. त्यामुळे बडोदा स्थानकावर एकच गोंधळ […]
आरेचे १८११ स्टॉल महानंदच्या नावाआड गुजरातच्या आनंद डेअरीला देण्याचा डाव

मुंबई – मुंबईतील आरे डेअरीची १८११ दूध विक्री केंद्र (स्टॉल) महानंद डेअरीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानंद डेअरी सध्या तोट्यात आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.अशा परिस्थितीत आरेचे स्टॉल महानंदच्या स्वाधीन करण्यामागे काळेबेरे आहे असा आरे स्टाॅलधारकांचा आरोप आहे .महानंदच्या नावाआडून हे स्टॉल केंद्राच्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अखत्यारितील गुजरातच्या आनंद डेअरीच्या घशात […]
कोयना धरणाचे दरवाजे उघडल्याने सतर्कतेचा इशारा

सातारा – कोयना धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणामध्ये एकूण १०२.४३ टीएमसी (९७.४४%) पाणीसाठा झाला असून मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे आज दुपारी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फूटापर्यंत उघडण्यात आले आहेत.कोयना धरणाचे दरवाजे उघडून सांडव्यावरून आणि पायथ्याच्या विद्युत गृहातून कोयना नदीतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. […]
शेअर बाजारात सलग दहाव्या दिवशी तेजी

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने २५,१२९ अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर निफ्टी ३४ अंकांनी वाढून २५,०५२ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टीत मात्र आज काहीशी घसरण झाली. बँक निफ्टी १३४ अंकांनी घसरून ५१,१४३ अंकांवर […]
खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंद

खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंदमुंबई – खार आणि वांद्रे पश्चिम येथे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही विभागातील नागरिकांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पाली हिल जलाशय १ आणि वांद्रे पूर्व येथील आर. के. पाटकर मार्गावरील जलवाहिनीचे काम शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १२ […]
उत्तरकाशीतील वरुणावत पर्वतावरुनदगडांचा वर्षाव! नागरिक भयभीत

उत्तरकाशी – उत्तरकाशीच्या वरुणावत पर्वतावरुन झालेल्या दगडांच्या वर्षांवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गोफियारा क्षेत्रात एकच गोंधळ झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या पर्वतावर जाऊन दगड पडण्याच्या कारणांची पाहणी केली.वरुणावत पर्वतावरुन काल रात्रीपासून अचानक दगडगोटे पडू लागले. ते अनेक वस्यांवर पडले. त्याने घाबरून जाऊन लोकांनी आपली घरे दारे सोडून मोकळ्या जागेत आश्रय घेतला. […]
१९५ वर्षांनंतर प्रथमच भीमाशंकर अभयारण्यात रानकुत्री आढळली

पिंपरी – भीमाशंकर अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा शोधनिबंध ‘झु प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे. सुमारे दोन शतकानंतर भीमाशंकर परिसरातील आढळलेल्या रानकुत्र्यांचा हा पहिलाच फोटोग्राफिक पुरावा असून यावर शोधनिबंधही प्रसिद्ध झाला आहे.या शोधनिबंधात झुलॉजिकल […]
पणजी बाजारात भाड्याने कापडी पिशव्या मिळणार

पणजी – प्लॅस्टिकचा वापर कायमचा बंद व्हावा यासाठी पणजी पालिकेने नवीन शक्कल लढवली असून आता पणजी बाजारात कापडी पिशव्या भाड्याने मिळणार आहेत. ग्राहकांना भाड्यापोटी २० रुपये शुल्क द्यावे लागेल अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. पणजी बाजारात ‘आमची पोती’ या उपक्रमास प्रारंभ झाला. यावेळी कलाकार सागर नाईक मुळ्ये, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक प्रमय माईणकर, […]
समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा! महिनाभरापूर्वीच झाली होती दुरुस्ती

छत्रपती संभाजीनगर- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. याच समृद्धी महामार्गावर ११ जुलैला छत्रपती संभाजीनगरपासून जवळ असणाऱ्या माळीवाडा इंटरचेंजवळ ३ सेंटीमीटर रुंदीच्या ५० फुट लांबीच्या भेगा पडल्या होत्या. यानंतर एमएसआरडीसीने या भेगा सिमेंटने बुजवल्या होत्या. मात्र आता या भेगांमधील सिमेंट बाहेर पडून या भेगा पुन्हा […]
आसाराम बापू जेलमधून बाहेर खोपोलीतील रुग्णालयात उपचार

रायगड – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. राजस्थान हायकोर्टाने १३ ऑगस्टला आसाराम बापूला उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर २ आठवड्यांनंतर त्याला रायगडच्या खोपोली येथील रुग्णालयात हृदयाच्या संबंधित उपचारासाठी आणले.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूला रात्री […]
मुलींचे विवाहाचे वय २१ वर्षे हिमाचलचा महत्वपूर्ण निर्णय

शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभेने मुलीच्या विवाहाचे किमान वय १८ वरुन २१ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल विधीमंडळाने कालच या संबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. याबरोबरच बालविवाह प्रतिबंधक विधेयक २०२४ ही काल आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.मुलीचे विवाहाचे किमान वय वाढवण्याचे विधेयक आरोग्य व समाजिक न्याय मंत्री धानी राम शांदिल यांनी सादर केले. त्यानंतर ते […]
हतगड किल्ला प्रवेशद्वाराजवळ कड्याची दरड कोसळली

नाशिक- सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या कड्याची दरड कोसळल्याचीघटना घडली.सुदैवाने यावेळी याठिकाणी पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र त्यामुळे किल्ल्याचा पायरी मार्ग धोकादायक बनला आहे. या किल्ल्याच्या कड्यावरून लहानमोठे दगड-गोटे अधूनमधून सतत पडत असतात.त्यातच आता मोठी दरड कोसळल्याने हा पायरी मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.त्यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तरी संयुक्त वन व्यवस्थापन […]
उत्तर प्रदेशातील ८ रेल्वेस्थानकांच्या नावात बदल

लखनऊ-भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील ८ रेल्वे स्थानकांच्या नावात बदल केला आहे. मोगल शासकांची ही नावे बदलण्यात आली असून या स्थानकांना संतांची व स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यात आली आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वझीरगंज स्थानकाचे नाव अमर शाहीद भाले सुलतान असे करण्यात आले असून फुरसतगंज स्थानकाचे नाव बदलून ते तापेश्वरनाथ धाम असे करण्यात आले आहे. याबरोबरच काशिमपूरचे नाव […]
भारत- चीनच्या युद्धनौका एकाच दिवशी कोलंबोमध्ये

कोलंबो – भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल झाल्या आहेत.या दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोत तीन दिवसांच्या दौर्यावर आहेत.भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेत दाखल झाली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने आयएनएस मुंबईचे उत्स्फूर्त स्वागत केले.हे फेई,वुझिशान आणि किलियनशान या १४७३ जणांसह दाखल झालेल्या चिनी युद्धनौकांचेही श्रीलंकेच्या नौदलकाकडून स्वागत […]
साताऱ्यातील सज्जनगडाच्या बुरुजाचे दगड कोसळले

सातारा – सातारा शहरापासून सुमारे अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सज्जनगडावर जाणाऱ्या प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूच्या बुरुजाचे दगड रविवारी रात्री सुरु असलेल्या पावसाने पायऱ्यावर कोसळले. तीन दिवस झाले तरीही ते दगड तसेच आहेत.प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने […]
कोयना धरण १०० टक्के भरले! नदीकाठवरील गावांना इशारा

कराड- महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या पाटणच्या कोयना धरणातील पाणीसाठा १००.३८ टीएमसी इतका झाला आहे.त्यानंतर आता आगामी पावसाची शक्यता आणि या धरणाची साठवण क्षमता लक्षात घेता या धरणातून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १२,४५५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून सध्या १००.३८ […]
गणेशोत्सवाआधी थकबाकी मिळावी! मंजुरीमुळे पालिका कर्मचारी आशावादी

मुंबई- मुंबई महापालिका पालिका कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतीच पालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली.राज्य सरकारच्या धर्तीवर पालिका अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.त्यामुळे विविध भत्त्यांमध्ये वाढ होणे गरजेचे होते.ही वाढ देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.मात्र आता ही भत्त्यांची मिळणारी […]
सनातन हिंदू धर्म की जय!फडणवीसांची दहीहंडीवेळी घोषणा

ठाणे- आज मुंबई, ठाणे, पुणे येथे दहीहंडी उत्सवानिमित्त गोविंदा पथकांनी उंचचउंच थर लावण्याची स्पर्धाच केली. जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने यंदाही 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या टेंभी नाका व इतर दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली आणि महायुतीच विजयाची दहीहंडी फोडणार अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे […]
कोलकात्यात डॉक्टर हत्येप्रकरणी पुन्हा उग्र आंदोलन! पोलीस बळाचा दणका

कोलकाता- कोलकाता येथील रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला नबन्ना अभिजान (अभियान) असे नाव देण्यात आले होते. त्यानुसार आज हजारो आंदोलकांनी नबन्ना म्हणजे पश्चिम बंगालच्या सचिवालयाकडे कूच केले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या मार्गात बॅरिकेडची भिंत उभारून, […]
