राज्य सरकारला शेवटची संधी! मनोज जरांगे-पाटलांचा इशारा

जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ देण्याचे फडणवीस दोषी असतील, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.जालन्यामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. मात्र आज त्यांची प्रकृती खालावली. सकाळी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी […]

तामिळनाडूत विद्यार्थ्यांमध्ये ‘कूल लीप’चे वाढते व्यसन

चेन्नई – तामिळनाडूमध्ये शाळकरी मुलांमध्ये बंदी घातलेल्या कूल लीप या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत आहे. याची गंभीर दखल मद्रास उच्च न्यायालयाने घेतली असून राज्याचे आरोग्य खाते, सरकारचे मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाला जबाबदार ठरविले आहे.ऑनेस्टराजा नावाच्या इसमाकडून पोलिसांनी कूल लीपची २७ पाकिटे जप्त केली. त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला असून […]

हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाचा बैलगाडी मोर्चा

नांदेड- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वराज्य पक्षाने आज हदगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, अन्यथा येणाऱ्या २७ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील […]

हिरामण खोसकरांचा राजीनाम्याचा इशारा

मुंबई – धनगर समाजाला अनुसुचित जमात प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी कडाडून विरोध केला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण दिल्यास आमदारकीचा तत्काळ राजीनामा देण्याचा इशारा खोसकर यांनी दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. यासंदर्भात नरहरी झिरवळ यांच्याशी आमची दोन तास चर्चा झाली आहे.आमच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण […]

पुण्यात विसर्जन मिरवणूक २८ तासानंतर समाप्त

पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल २८ तास पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. पुण्यातील प्रमुख चार रस्त्यांवरून या मिरवणुका निघाल्या होत्या. मानाच्या गणपतीसह इतर मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होती. मिरवणूक संपल्यानंतर अलका चौकामध्ये स्वच्छता मोहीम […]

जय मालोकरचा मारहाणीमुळे मृत्यू! पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती

अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱे अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू […]

नंदूरबारमध्ये डुकरांच्या स्वाईन फिव्हरचा कहर

नंदूरबार- नंदूरबार जिल्ह्यातील आष्टे गावातील काही डुकरांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिव्हरने झाला आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय अतीसुरक्षित प्राण्याच्या साथरोगांविषयीच्या प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. या रोगाचा प्रसार होऊन तो मानवी वस्तीतही पसरू नये यासाठी नंदुरबार तालुक्यातील दहा किलोमीटरचा परिसर बाधीत म्हणून घोषित करण्यात आला आहे.नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी या विषयी माहिती दिली आहे. त्या […]

छत्तीसगडमध्ये सशस्त्र दलाच्या जवानाचा गोळीबार! दोन ठार

बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले जात आहे.छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या भुताही या तळावर आज दुपारी ही घटना घडली. सीएएफ ११ व्या बटालियनच्या जवानांचे दुपारी जेवण सुरु असतांना एका जवानाने जेवणात तिखट मागितले. त्याला […]

कामाच्या दबावामुळे तरुणीचा मृत्यू! मृत्यूनंतर आईचा कंपनीवर आरोप

पुणे –बिग ४ अकाउंट फर्मच्या एनवाय कंपनीच्या पुण्यातील एका शाखेतील ऍना सॅबेस्टियन (२६ )चार्टर्ड अकाउंटंट या तरुणीच्या कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी कंपनीवर केला आहे. तिच्या मृत्यूनंतर ऍनाच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिले आहे. मुलीने मार्च २०२४ मध्ये कंपनीत नोकरी पत्करल्यापासून ती नेहमीच कामाच्या तणावाखाली असायची. ऍनाचा […]

ठाकरेंना २ लाखांचा डीडी देणार! चव्हाणांना पोलिसांनी अडवले

मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांना २ लाखांचा डीडी देण्यास आलो होतो, मात्र त्यांनी डीडी स्वीकारला नसल्याचे मोहन चव्हाण यांनी सांगितले.उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या चव्हाणांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद […]

युरोपात बोरिस चक्रीवादळाचा कहर! २० जणांचा मृत्यू! १५ जण बेपत्ता

प्राग- युरोपच्या मध्य व पूर्व भागाला बोरिस या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासूनच्या पूरस्थितीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात अनेकजण जखमी झाले असून १२ ते १५ जण बेपत्ता आहेत. युरोपातील, चेक गणराज्य, पोलंड, ऑस्ट्रिया, रोमानिया, स्लोवाकिया, हंगेरी, जर्मनी, क्रोशिया या देशांमध्ये हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी […]

अयोध्येतील ‘लोढा’चे जमीन संपादन वादात शेतकरी आणि कंपनी कर्मचाऱ्यांत हाणामारी

अयोध्या – अयोध्येतील जमीन संपादनाचा मुद्दा तापला असून यातून स्थानिक शेतकरी आणि ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनी’च्या कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यात लोढा यांच्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. लोढा यांची कंपनी बळजबरीने जमीन संपादन करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन झाल्यापासून जमिनीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून अनेक बांधकाम प्रकल्प उभे […]

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक ३ महिन्यांच्या बंदीनंतर सुरू

मालवण – गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली किल्ला सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. काल मंगळवारपासून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन सेवेला आता सुरुवात झाली आहे,अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली. मंगेश सावंत यांनी सांगितले की,सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टी भागातील पर्यटन सेवा २५ मे पासून बंद होती.दरवर्षी बंद होणारा […]

अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला आग

अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्‍या कारखान्‍याला आज सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी शेंगदाणा आणि इतर तेलबियांचे गाळप गेले जाते. कारखान्‍यात ज्‍वलनशील तेलाचा मोठा साठा असल्‍याने आगीने लगेच रौद्र रुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अग्निशमन दलाचे […]

राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या! आता भाजपा खसदार बोंडे बरळले

मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटू नका. त्यांच्या जिभेला चटक दिले पाहिजेत,असे बोंडे म्हणाले. राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात देशातील आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागली की काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करील […]