राजस्थानच्या बालोतरात भूकंपाचे सौम्य धक्के

जयपूर – राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्याला आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी बालोतरा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बालोतरा शहरात होते व ५ किलोमीटर परिसरात हे धक्के जाणवले. जमिनीला अचानक कंपन जाणवू लागल्याने लोक घाबरुन गेले. […]

वीज कर्मचारी-अधिकाऱ्यांचा आजपासून ४८ तासाचा संप

सिंधुदुर्ग -वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस ४८ तासांचा संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सुमारे एक लाख कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली. सर्व वीज कर्मचारी-अभियंता व अधिकाऱ्यांना […]

हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान

कोलंबो – श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी अनुरा दिसनायके यांच्या निवडीनंतर पंतप्रधानपदी नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीच्या नेत्या हरिणी अमरसूर्या यांची निवड झाली आहे. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २००० मध्ये सिरिमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या महिला पंतप्रधान होत्या. त्यानंतर अमरसूर्या या श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनुरा दिसनायके हे विजयी झाल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी राजीनामा दिला होता. […]

उद्योजक इलॉन मस्क आतामंगळावर माणूस पाठवणार

वॉशिंग्टन – अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी आगामी दोन वर्षांत मंगळ ग्रहावर पाच अंतराळ यान पाठविणार आहे.या पाचही यानांचे मंगळावर यशस्वी अवतरण झाले तर पुढील चार वर्षांत मंगळावर अंतराळवीर पाठविण्याची कंपनीची योजना आहे.मस्क यांनी एक्स पोस्टमधून ही माहिती दिली.मंगळावर मानवविरहित यान पाठविण्याच्या पाच मोहिमांमध्ये थोडीशी जरी त्रुटी आढळली तरी मानवाला मंगळावर पाठविण्याची मोहीम […]

गोव्यातील वेर्णा -लोटली मार्गावर कोसळली दरड

मडगाव – दक्षिण गोव्यातील वेर्णा – लोटली या महामार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.वाहनांची वाहतूक सुरू असतांना डोंगराचा काही भाग कोसळून मार्गावर आला.मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील बारा दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यातच ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.वेर्णा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव […]

विनेशने देशाची माफी मागावी कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे मत

नवी दिल्ली – पॅरीस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्याने खरे तर विनेश फोगट हिने देशाची माफी मागितली पाहिजे.कारण ५० किलो वजनी गटात ती बसली नाही ही तिची चूक आहे. या चुकीची कबुली तिने दिली पाहिजे, असे मत लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने एका मुलाखतीत मांडले.एखादा खेळाडू ऑलिम्पिकसारख्या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत वैयक्तिक चुकांमुळे अपात्र ठरतो […]

प्रिया दत्त वांद्र्यात उमेदवार?वर्षा गायकवाडांनी घेतली भेट

मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आज माजी खासदार प्रिया दत्त यांची भेट घेतली असून त्या विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रिया दत्त या मुंबई उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाच्या माजी खासदार आहेत. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत […]

निवडणूक आयोगाचे पथक उद्या मुंबईत दाखल होणार

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे १४ सदस्यीय पथक गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर असे तीन दिवस हे पथक महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. काल या पथकाने झारखंडमध्ये निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे […]

श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगावर फुलांची उधळण

जुन्नर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या लाकडी पलंगाचे आगमन नुकतेच तालुक्यातील राजुरी येथे झाले.यादवकालीन परंपरेनुसार रविवारी सायंकाळी या पलंगाचे राजूरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी या पलंगावर फुलांची उधळण केली. राजुरी येथील तिळवण तेली समाजातील कै. बाबुराव व आप्पा रामभाऊ विकास (मेहतर) या घराण्याकडे पलंगाची सेवा करण्याचा मान परंपरेने आहे.या पलंगाच्या मुक्कामाचे शेवटचे […]

देशात मोसमी पावसाचा कहर आसामात मात्र उष्णतेची लाट

नवी दिल्ली – देशातील अनेक भागात मोसमी पाऊस शेवटच्या षटकात जोरदार बॅटिंग करीत आहे. जाता जाता देशातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या भागात जोरदार पाऊस झाला. आसाममध्ये मात्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या.उत्तर प्रदेशातील २१ जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून कानपूर जिल्ह्यातील १३ गावांमध्ये पांडू नदीचे पाणी शिरले आहे. बिहारमध्ये १२ जिल्हयांना […]

तेल आणि नैसर्गिक वायू साठेलिलावात रिलायन्सची बोली

नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा देशातील आजवरची सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिल्यांदाच ओएनजीसी आणि बीपी पीएलसी या कंपन्यांसह गुजरातमधील एका साठ्यासाठी संयुक्तपणे बोली लावली.देशभरातील १.३६ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये असलेल्या अशा २८ ठिकाणांचा (ब्लॉक्स) या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. या ठिकाणी […]

समृद्धी महामार्गावरील टोल वसुली एजन्सीचे कंत्राट रद्द

नागपूर -समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करणाऱ्या मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या रोडवेज सॉल्यूशन्स कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ही कारवाई केली.समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करण्याचे कंत्राट रोडवेज सॉल्यूशन्स कंपनीला ११ डिसेंबर २०२२ ला देण्यात आला होता. तो आता रद्द करण्यात […]

राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरी ही भेट झाली.’येक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सलमानच्या घरी आले होते,असे सांगण्यात आले. उद्या संध्याकाळी वांद्रे येथील ताज लँडस एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये […]

कणकवलीच्या नाटळमध्ये सह्याद्रीचा कडा कोसळला

कणकवली – काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास ३०० मीटरचा हा ढासळलेला भाग साधारण ३०० मीटर लांबीचा आहे. दोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे डोंगर कोसळून एक घर जमीनदोस्त झाले होते. तसेच या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नाटळसह सह्याद्री पट्टयातील गावांमध्ये चिंता व्यक्त होत […]

तिरुपतीच्या लाडवात तंबाखुची पुडी

तिरुमला – तिरुपतीच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात चरबी मिसळण्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता या लाडूमध्ये चक्क एका कागदात गुंडाळलेले तंबाखू सापडली आहे. देवस्थानने हा प्रसाद पवित्र असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर सापडलेल्या या पुडीने मंदिराच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.कम्मन जिल्ह्यातील धोंतू पद्मावती या १९ सप्टेंबरला तिरुपती येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लाडवाचा […]

आता दरवाढ रोखण्यासाठी ‘बफर स्टॉक’ ची कांदा विक्री

नवी दिल्ली – केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे या कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक बाजारात ‘बफर स्टॉक’मधून विक्री मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे,असे ग्राहक कल्याण खात्याच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले. सचिव निधी खरे म्हणाले की,दिल्लीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो ३८ रुपये होते.ते वर्षभरात […]

यापुढे मुंबई पालिकेच्या ठेवी मुदती आधी मोडण्यास प्रतिबंध

मुंबई- गेल्या पाच वर्षांत मुंबई महापालिकेच्या २३६० कोटींच्या ठेवी मुदतीआधीच मोडल्या असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.मात्र आता यापुढे पालिकेच्या शिल्लक रकमेपैकी कमीतकमी २५ टक्के रकमेच्या ठेवी मुदतीच्या आधी संबंधित बॅंकांमधून मोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यापुढे पालिकेचे आर्थिक हित जपण्यासाठी अधिशेष रकमेच्या किमान २५ टक्के रकमेची गुंतवणूक ही नॉन कॉलेबल असणार आहे. म्हणजेच अशी […]

तिरुपतीनंतर सिद्धिविनायक प्रसादाचे लाडू उंदीर कुरतडतात

मुंबई – तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिल्या जाणार्‍या लाडवात जनावरांची चरबी आणि माशाचे तेल असल्याचा गौप्यस्फोट झाल्यानंतर मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिराचा प्रसादाचा लाडू वादात सापडला आहे. या मंदिरातील प्रसादाचे लाडू उंदीर कुरतडतात आणि प्रसादाच्या लाडवाच्या ट्रे मध्ये उंदराची पिल्ले फिरतात असा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.उंदरांनी पाकीट कुरतडून खाल्लेले हेच लाडू गणेशभक्तांना दिले जात असल्याने […]

बदलापूरचा आरोपी शिंदेचे पोलीस एन्काउंटर काय लपविण्यासाठी त्याला ठार मारले?

मुंबई – बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. यामुळे शाळेचे फरार असलेले संस्थापक आपटे आणि शाळा प्रशासनाला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेला कायमचे गप्प केले का? असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात भररस्त्यात पोलिसांनी आरोपीला ठार केल्याच्या या घटनेमुळे खळबळ माजली असून अनेकांना या घटनेचा […]