मुंबई विमानतळावर दुर्मिळ कासवे जप्त

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या उद्देशाने आणलेली दुर्मिळ कासवे जप्त करण्यात आली आहेत. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ दुर्मिळ जातीची ही कासवे जप्त करुन ती त्यांच्या मूळ देशात परत पाठवली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांची किंमत प्रत्येकी २०० ते २५० डॉलर असल्याचे सांगण्यात येते.आज मुंबई विमानतळावर थायलंडच्या बँकॉक इथून आलेल्या एका प्रवाशाने ही कासवे आणली […]
धोकादायक प्रदूषणामुळे लाहोरचे जनजीवन ठप्प

लाहोर – आरोग्यास धोकादायक धूर, धूळ यामुळे श्वास घेण्यास अडचण होत असल्याने पाकिस्तानच्या लाहोर शहरातील व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही ठप्प झाले . प्रदुषणामुळे लाहोरच्या शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.लाहोर शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर झाले आहे. आज सकाळी लोहोरमधील हवेची गुणवत्ता […]
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उद्या निकाल

वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे.अमेरिकेच्य राष्ट्राध्यक्षपदासाठी माजी राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांची लढत विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबरोबर होत आहे. अमेरिकेतील मतदान आज पूर्ण झाले असून काही राज्यात ते उद्या पूर्ण होईल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. सहसा मतदानानंतर काही तासात […]
रत्नागिरीत भात कापणीच्या कामाला वेग

कणकवली – गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली आहे . त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातकापणी ,तसेच भात झोद्नी सुरु केली आहे.मात्र तळकोकणात म्हणजेच कुडाळ , मालवण , वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये अजून काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे.अवकाळी पडलेल्या पावसाने ग्रामीण भागात भातशेतीचे नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, पूर्णगड, पावस येथे भात […]
दगडूशेठ हलवाई गणपतीला ११०० नारळांचा महानैवेद्य

पुणे : गाणपत्य संप्रदायाच्या वतीने कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवात आज तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करण्यात आली.यानिमित्त दगडूशेठ मंदिरात नारळांची आरास करण्यात आली. पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्तपठण झाले.
संजय वर्मा राज्याचेनवे पोलीस महासंचालक

मुंबई – राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून हटवण्यात आले. पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार विवेक फणसळकर यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला होता.त्यानंतर आज राज्याच्या पोलीस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली . संजय वर्मा हे १९९० च्या […]
हडपसरच्या हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर !

पुणे- दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे.विशेषतः पुणे शहरातील हडपसर भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. दिवाळी निमीत्त पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होतो. फटक्यांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा […]
कोल्हापूरच्या अनेक भागात रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग

कोल्हापूर- शिरोळ आणि हातकणंगलेसह अनेक भागात सध्या रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग दिसत आहे. ज्वारी,गहू, हरभरा,मका,करडई आणि सूर्यफुल यासारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या रब्बीच्या हंगामात गुंतला आहे. काही शेतकरी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लहान ट्रॅक्टरने रब्बीची पेरणी करत आहेत.त्यामुळे शेतकर्यांची कामे सोपी आणि जलद होण्यास मदत […]
‘लाडकी बहीण’ची रक्कम दुप्पट करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा ग्वाही

सातारा – जनतेने जर पुन्हा सत्तेची सूत्रे अधिक ताकदीने हाती सोपविली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे पुन्हा दिली. महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते कोरेगाव येथील सभेत बोलत होते. याप्रसंगी महेश शिंदे यांचा माझा लाडका आमदार असा […]
माफी माग किंवा ५ कोटी दे सलमानला पुन्हा धमकी

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. जिवंत रहायचे असेल तर बिष्णोई मंदिरात माफी मागा किंवा ५ कोटी रुपये दे असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे . काल रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक संदेश प्राप्त झाला. त्यात लिहिले होते, ‘जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याला आमच्या बिष्णोई मंदिरात जाऊन […]
बोईंगच्या कारखान्यातील संप मिटला! ३८ टक्के पगारवाढ

सिएटल – जागतिक स्तरावरील आघाडीची विमान उत्पादक कंपनी असलेल्या बोईंगने आपल्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के पगारवाढ दिली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ७ आठवडे चाललेला संप अखेर मागे घेतला आहे. ही पगारवाढ येत्या ४ वर्षांसाठी असून हा नवा प्रस्ताव स्विकारण्याच्या बाजूने ५९ टक्के कर्मचाऱ्यांनी मत दिले आहे.बोईंग कंपनीच्या सिएटल येथील वेस्ट कोस्ट येथील कारखान्यात गेल्या ७ आठवड्यांपासून पगारवाढीसाठी […]
सिंधुदुर्गातील हापूसची पहिली पेटी तयार ! २५ हजार किंमत

सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांच्या बागेतून थंडीच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठविण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातील या पहिल्या चार डझन आंब्याच्या पेटीला २५ हजार रुपये दर मिळाला आहे. उत्तम फोंडेकर यांनी जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या मोहोराचे संरक्षण करून उत्पादन घेतले आहे. आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी चौथ्यांदा मिळविला […]
दिवाळी सुट्टी संपल्याने कांदा लिलाव पुन्हा सुरू

लासलगाव- सहा दिवसांच्या दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कालपासून कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. काल सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात ८०० क्विंटल कांद्याची आवक झाली.याठिकाणी कांद्याला कमीत कमी ३८०० रुपये तर सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. काल सोमवारी पणन मंडळातर्फे सांगण्यात आले की,सकाळच्या सत्रात १९ हजार क्विंटल कांदा आवक झाली.मुंबई मार्केटला सर्वाधिक ७ […]
राज्यातील ८७ मतदारसंघात यंदा २ ईव्हीएम मशीन लागणार

मुंबई- यंदा काही राजकीय पक्षांची विभागणी झाल्याने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमालीची वाढली आहे. यावेळी राज्यातील २८८ पैकी तब्बल ८७ मतदारसंघात दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे.राज्यात सर्वांत जास्त ३४ उमेदवार माजलगावमध्ये तर सर्वांत कमी फक्त तीन उमेदवार शहादा मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद […]
आजपासून ‘माथेरानची राणी’ पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार

कर्जत – पावसाळ्यात विश्रांतीला गेलेली माथेरानची राणी म्हणजेच नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर उद्या ६ नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. काल सोमवारी मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबतचे पत्रक जारी केले. आतपर्यंत पावसाळ्यात बंद होणारी माथेरान मिनी ट्रेन दसऱ्याला सुरू व्हायची. मात्र,यंदा दसरा आणि दिवाळी संपली तरी ही ट्रेन सुरू झालेली नव्हती.त्यामुळे पर्यटक नाराज झाले होते. मात्र […]
जत तालुक्यात भाजपकडून लिंगायत समाजावर अन्याय

सांगली – जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे.तरीही भाजपाने लिंगायत समाजाला तिकीट दिले नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी लिंगायत समाजावर केलेला हा अन्याय आहे, असा आरोप अभिनव गुरुलिंग जंगमा महास्वामीजी यांनी केला आहे. अभिनव गुरुलिंग जंगमा महास्वामीजी म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करून जत मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिकपणे […]
राज ठाकरे मोदी – शहा यांची तळी उचलतात! राऊत यांची टीका

मुंबई – राज ठाकरे मोदी शहांची तळी उचलतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. काल राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात, मुख्य मैदानात काय चालले आहे यावरून बोलावे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. हीच शिवसेना […]
माफी माग किंवा ५ कोटी दे! सलमानला पुन्हा धमकी

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. जिवंत रहायचे असेल तर बिष्णोई मंदिरात माफी मागा किंवा ५ कोटी रुपये दे असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे . काल रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक संदेश प्राप्त झाला. त्यात लिहिले होते, ‘जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याला आमच्या बिष्णोई मंदिरात जाऊन […]
कॅनडातील मंदिरात भक्तांवर खलिस्तान समर्थकांचा हल्ला

टोरांटो – खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन दिले जात असल्याने भारत व कॅनडातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच काल ब्रॅम्पटन येथील एका मंदिरावर खलिस्तान समर्थक गटाने मंदिरात घुसून हल्ला केला. यावेळी मंदिरात जमलेल्या लोकांना त्यांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा कॅनडाचे पंतप्रधान व इतरांनी तीव्र शब्दात निषेध केला असला तरी या घटनेने खळबळ माजली आहे. कॅनडात […]
निवडणुकीच्या रिंगणातून जरांगेंची सपशेल माघार उमेदवार देणार नाही! पाडापाडीही करणार नाही!

जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून रान उठविणारे, विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरविण्याची भीष्मप्रतिज्ञा करणारे, देवेंद्र फडणवीस यांना इंगा दाखविण्याची भाषा करणारे, सुपडा साफ करतो म्हणणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज अचानक न पटणारे कारण देत भूमिका बदलत निवडणुकीतून पूर्ण माघार घेण्याची घोषणा केली. मी एकही उमेदवार उभा करणार नाही असे त्यांनी जाहीर केले. जरांगे यांनी निवडणुकीतून नुसतीच […]
